केंद्र सरकारने १९९८-९९ मध्ये किसान क्रेडीट कार्ड देण्याची घोषणा केली. या घोषणेचा उद्देश शेतकऱ्यांच्या कर्जाची कपात करणे, कृषी संबधी खर्चासाठी पर्यायी साधन कर्जाची सुविधा करणे, तसेच आकस्मिक खर्च देणे हा आहे. याची जबाबदारी एस बी आय आणि नाबार्ड ने घेतली आहे. किसान क्रेडीट कार्ड १९९८ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याद्वारे सुरु केली. त्यामुळे शेतकर्याना कर्ज मिळू लागले. परिणामी शेतकर्यांना कर्ज मिळणे सोपे झाले. म्हणून हि सुविधा चांगली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याला ५०,००० ते ३००००० लाख पर्यंत कर्ज घेता येते. याचे व्याजदर ६ महिन्यापर्यंत ४% तसेच १वर्षासाठी ७% असते. शेतकरी किसान क्रेडीट कार्डमुळे पिकाचे विमे काढू शकतो.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर खर्च दिला जातो.जसे की अतिवृष्टीमुळे पिक खराब झाले, कोरड्या दुष्काळामुळे पिक करपले तर हि सुविधा उपयोगी पडते.
क्रेडीट कार्डचे फायदे :-
- किसान क्रेडीट कार्ड मुळे शेतीला आवश्यक वस्तू किंवा अवजारे खरेदी करू शकता.
- पिक आल्यानंतर कर्ज फेडू शकतो.
- १.६०लाख रु. पर्यंत लोन घेण्यासाठी जमीन गहाण ठेवण्याची गरज नाही.
- तारणाविना कर्ज मिळते.
क्रेडीट कार्डसाठी अर्ज कसा करायचा :-
- किसान क्रेडीट कार्ड केंद्र सरकारची अशी योजना आहे ज्याद्वारे कर्ज मिळते.
- सर्व प्रथम एस बी आय योनो अँप डाऊनलोड करा.
- योनो व्हिझीट अँग्रीकल्चर
- केसीसी रिव्यू विभागामध्ये जाणे
- अप्लायवर क्लिक करा.
Leave a reply