मल्चिंग पेपर हा प्लास्टिक पासून बनवलेला पेपर आहे. तो बेडवर / वाफ्यांवर टाकला जातो. ह्यामुळे तणापासून संरक्षण,तसेच जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण मिळते .याशिवाय पाण्याची बचत होते. एकसमान तापमान, एकसमान ओलावा राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे पाण्याची बचत होते व पिकाला फायदा होतो. टरबूज, मिरची यासारख्या पिकांवर मल्चिंग पेपर वापरल्यास व्हायरस पासून संरक्षण होते.
मल्चिंग पेपर कोणता वापरायचा ?
मल्चिंग पेपरची रुंदी साधारणतः अडीच फुट, सव्वा तीन फुट व चार फिट असते. या मापाचे मल्चिंग पेपर पूर्ण शेतासाठी वापर न करता सरीमधील अंतर विचारात घेऊन, तसेच चालण्यास जागा ठेऊन वापरायचे असतात. मल्चिंग पेपर वेगवेगळ्या जाडी मध्ये येतो २० मायक्रॉन, २५ मायक्रॉन व ३० मायक्रॉन . तसेच याच्याशिवाय १५ मायक्रॉन, ४० मायक्रॉन परंतू ह्यांचा फायदा शेतकऱ्यांना जास्त होत नाही. २० मायक्रॉन मल्चिंग चार महिने वापरता येते. एक पिक आहे तर त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. दोन घ्यायचे असेल तर ६ ते ८ महिने वापरू शकतो. ३० मायक्रोन १२ते १५ महिने चालतो.
मल्चिंग पेपर कसा वापरायचा :-
मल्चिंग पेपर लावताना कोणता रंग वर आला पाहिजे आणि कोणता रंग खाली आला पाहिजे. ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे त्या ठिकाणी सिल्वर रंग वर घेतला पाहिजे. जेंव्हा शेतीच्या आजूबाजूला तापमान ३६ सेल्सिअस असते काळा रंग खाली ठेवायचा आहे. काही ठिकाणी तापमान कमी असते त्या ठिकाणी मल्चिंगचा काळा रंग वर ठेवायचा आहे.त्यामुळे रोपाला लागणारी उष्णता हा पेपर शोषून घेतो.
मल्चिंग पेपर कसा ओळखायचा :-
मल्चिंग पेपरचा रंग हा संपूर्ण लांबीत एकसमान असला पाहिजे. पेपर ओढून पहायचा त्यामुळे पेपरची क्षमता लक्षात येते.जर ओढल्यानंतर पेपर तुटला तर तो चांगल्या प्रतीचा मल्चिंग पेपर होत नाही. हा पेपर ओढल्यानंतर मोठा होईल तेव्हा तो पारदर्शक नाही झाला पाहिजे. जर रंग समप्रमाणात वापरले असतील तर रंग कायम राहतो. या पेपर मध्ये वेगवेगळे रसायन टाकलेले असतात ज्यामुळे ह्याची टिकण्याची क्षमता वाढते
Leave a reply